व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Thursday, November 30, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अमेरिकेतील चिन्मय आणि प्रज्ञाचे मोदींनी केले कौतुक

India Darpan by India Darpan
October 25, 2020 | 9:18 am
in संमिश्र वार्ता
0

नवी दिल्ली – अमेरिकेतील चिन्मय आणि प्रज्ञा पाटणकर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंडभरुन कौतुक केले आहे. मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते. मल्लखांब अनेक देशात प्रसिद्ध आहे. अमेरिकेत चिन्मय आणि प्रज्ञा यांनी त्यांच्य घरातच मल्लखांब शिकविण्यास प्रारंभ केला. हळूहळू प्रतिसाद वाढला आणि आता अनेक ठिकाणी ते मल्लखांब प्रशिक्षण केंद्र चालवित असल्याचे मोदी यांनी सांगितले. ही बाब अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले.

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या मन की बात मध्ये मोदी हे विविध विषयांवर भाष्य करतात.  मोदी म्हणाले की, ‘न हि ज्ञानेन सदृष्यं पवित्र मिह विद्यते’ अर्थात, ज्ञानासारखं, जगात काहीच पवित्र नाही.  ज्ञानाचा प्रसार करणारे, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या सर्व महोदयांचं मी, मनापासून अभिनंदन करतो. बापूजींनी सरदार पटेल यांच्या विषयी म्हटलं होतं की, त्यांच्या विनोदी गप्पा गोष्टी मला एवढ्या हसवतात की हसून हसून माझे  पोट दुखायला लागते.  याच्यात आपल्यासाठी  शिकवण आहे की कितीही वाईट परिस्थिती असेल तरीही आपली विनोदबुद्धी जागृत ठेवायला हवी, असं पंतप्रधान म्हणाले.

आम्हाला नेहमीच आपल्या सर्जनशीलतेने, प्रेमाने, प्रत्येक क्षणी,  प्रयत्नपूर्वक, एक भारत श्रेष्ठ भारत, हे तत्व  सुंदर रंगात साकार करायचे  आहे. काश्मिर खोरे, संपूर्ण देशभरातील, ९० टक्के पेन्सिल स्लेट, लाकडी पट्टीची मागणी पुरी करते आणि त्यात देखील खूप मोठा भाग पुलवामाचा आहे. एक काळ असा होता की जेव्हा आपण विदेशातून पेन्सिली साठी लाकूड मागवत होतो. पण आता आमचा पुलवामा, देशाला आत्मनिर्भर बनवतो आहे, असे त्यांनी सांगितले.


Previous Post

सरसंघचालक भागवत यांनी दिला चीनला हा इशारा

Next Post

या फुलला काजू, बदमापेक्षाही ज्यादा भाव

Next Post

या फुलला काजू, बदमापेक्षाही ज्यादा भाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्न औषध प्रशासनाची विशेष मोहीम; २९ लाख ६६ हजार रूपयांचा साठा जप्त, २२२ आरोपींना अटक

November 30, 2023

येवला व निफाड तालुक्यातील अवकाळीने झालेल्या नुकसानीची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी..

November 30, 2023

सॅम बहादूर चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच खूप चर्चा….विकी कौशल, फातिमा शेखचा कसदार अभिनय ( बघा व्हिडिओ)

November 30, 2023

भरधाव दुचाकी घसरल्याने ४५ वर्षीय चालकाचा मृत्यू

November 30, 2023

या स्वायत्त महाविद्यालयांवर कारवाई होणार.. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत निर्णय

November 30, 2023

राष्ट्रवादीत बंड करण्याचे कारणच सुनील तटकरेंनी सांगत केला गौप्यस्फोट

November 30, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.